नाशिकच्या दिंडोरीमध्ये थेट विहिरीत कार कोसळून भीषण अपघात नऊ जणांचा मृत्यू ... अत्यंत दुर्दैवी

नाशिकच्या दिंडोरीमध्ये थेट विहिरीत कार कोसळून भीषण अपघात नऊ जणांचा मृत्यू ... अत्यंत दुर्दैवी 


 नाशिकच्या दिंडोरीमध्ये विहिरीत कार कोसळून नऊ जणांचा मृत्यू झालाय. अपघातातील मृत हे दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळतीय. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून बचाव कार्य हे सुरू करण्यात आलेलं होतं. अपघातातील कार ही क्रेनच्या सहाय्याने विहरीमधून बाहेर काढल्यानंतर कार मध्ये एकूण नऊ जण असल्याची माहिती मिळालेली असून कार मधील नऊ जणांचाही मृत्यू झालेला आहे. नाशिकच्या दिंडोरी भागातली ही सगळी घटना आहे आणि याच संदर्भामधले आपण अधिक माहिती जाणून घेऊ या 


अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे नेमकं काय घडलेलं होतं कसा हा अपघात झाला? नक्कीच अतिशय धक्कादायक खरंतर ही घटना आहे  आपण जर पाहिलं तर रात्रीच्या वेळी ही कार मध्ये नऊ जण एकाच कुटुंबातले होते त्यामध्ये दोन पतीपत्नी आणि सात चिमुरडे असल्याची माहिती खरंतर समोर आलेली आहे. दिंडोरीमध्ये खरंतर ही घटना घडलेली आहे एका खाजगी कोचिंग क्लास च्या कार्यक्रमासाठी ते सगळे त्या ठिकाणी गेलेले होते आणि परतीच्या मार्गावर असताना गाडीचा अंदाज न आल्याने त्या ठिकाणी ही गाडी थेट एका विहिरीमध्ये गेली.


रात्री दहा ची वेळ होती नाशिकच्या दिंडोरी मधल्या शिवाजीनगर परिसरात मोठा आवाज झाला हा आवाज आला होता राजेंद्र राजे यांच्या विहरीमधून एवढा मोठा आवाज कशामुळे झाला नेमकं काय घडलं हे बघायला आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी धाव घेतली आणि काही प्रत्यक्ष दर्शनी सांगितलं विहरीत एक कार पडली आहे विहीर खोल होती विहिरीला पाणी होतं गावकऱ्यांनी पोलिसांना फोन लावला बचाव पथक आलं क्रेन बोलवण्यात आली हायड्रा मशीन बोलवण्यात आलं बचावाचे प्रयत्न सुरू झाले रात्री एक च्या सुमारास हे बचाव कार्य थांबलं कारण अपघातग्रस्त गाडी आणि
एकूण नऊ मृतदेह या विहिरीतून बाहेर काढण्यात आले या नऊ जणांमध्ये सहा चिमुकल्यांचा समावेश होता खाजगी क्लासच्या गॅदरिंग वरून येत असलेले एक सगळं कुटुंबच या अपघातात मृत्युमुखी पडलं पण हा अपघात नेमका कसा झाला नेमकं काय घडलं आणि पोलिसांनी या अपघाताबद्दल काय कारवाई केली आहे पाहूयात या बातमी मधून 



दिंडोरीच्या इंदोरे गावात राहणार दरगोडे कुटुंब या कुटुंबातले नऊ जण 3 एप्रिलच्या रात्री एका खाजगी क्लासच्या स्नेह संमेलनासाठी दिंडोरी शहरात आले होते. रात्री 10 च्या सुमारास ते एक्सएल सिक्स
गाडीने पुन्हा आपल्या घराकडे प्रवास करण्यासाठी निघाले त्यावेळी शिवाजीनगर परिसरात अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या विहरीत त्यांची गाडी कोसळली. आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने धाव घेतली पण बचाव कार्य सोप्प नव्हतं क्रेन आणि हायड्राच्या माध्यमातून अपघातग्रस्त गाडी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले पण विहरीत पाणी भरपूर होतं त्यात अंधार पसरलेला आणि विहरीत चिखल असल्यानं पोलीस आपत्ती व्यवस्थापन पथक यांची कसोटी लागली. त्यात नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने परिस्थिती तणावाची बनली होती. पण काही नागरिकांनी पुढे येत प्रशासनाची मदत केली. 


अथक प्रयत्नानंतर रात्री एक च्या सुमारास ही कार बाहेर काढण्यात आली. ही गाडी इतकी वेगात खाली कोसळली होती की गाडीत असलेल्या नऊ जणांना बाहेर पडायची संधीच मिळाली नाही. श्वास गुदमरून नाकातोंडात पाणी जाऊन नऊही जणांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला पाच मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आलं होतं पण सकाळपर्यंत सगळ्याच नऊ मृतदेहांची ओळख पटली. हे नऊ जण एकाच कुटुंबातले होते. सुनील दरगोडे त्यांच्या पत्नी रेशमा, मुलगी गुणवती तर त्यांच्या भावाची पत्नी आशा अनिल दरगोडे, भावाची मुलं श्रावणी, श्रेयस, सृष्टी, श्रद्धा आणि समृद्धी दरगोडे अशा नऊ जणांचा या अपघातात मृत्यू झाला.


दुर्दैवाची गोष्ट म्हणजे समृद्धी दररोगोडेच वय फक्त सात वर्ष होतं तरी पाच मुलांची वय 11 ते 14 वर्षांमधली होती खाजगी क्लासच्या गॅदरिंग वरून परत येत असताना आनंदाच्या वातावरणातून परत येताना या नऊ जणांवर काळाने झडप घातली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं कुणाला वाचण्याची कुटुंबातल्या सदस्यांना वाचवण्याची संधी सुद्धा मिळाली नाही पण साहजिकच एक प्रश्न पडतो तो म्हणजे हा अपघात झाला कसा?
 शहरातल्या रस्त्यावरून चाललेली ही कार अचानक विहरीत कशी कोसळली तर स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार 
एमए 15 जेएस 1053 या नंबरची मारुती एक्सल सि गाडी मधून हे कुटुंब प्रवास करत होतं रात्री रस्त्याला फारशी वर्दळ नसल्याने गाडीचा वेग जास्त असल्याची शक्यता वर्तवली जात आहे पण महत्त्वाचं म्हणजे जिथे स्नेह संमेलनाचा कार्यक्रम झाला होता तिथून अगदी 100 मीटर अंतरावर ही विहीर आहे विहिरीच्या आजूबाजूला कॉलनी रोड आहे तिथून गाड्यांची यजा सुरू असता जिथे सिमेंटचा रस्ता संपतो तिथून अगदी दोन ते तीन फुटांवर ही विहीर आहे. 3 एप्रिलच्या रात्री कार्यक्रम असल्यान या भागात गाड्यांच पार्किंग केलं होतं त्यामुळे ही विहीर ड्रायव्हला दिसली नसावी.

त्यात या विहिरीला फक्त एक वीत लांबीचा कठडा आहे. त्यामुळे या कठड्याला धडकूनच ही गाडी खाली कोसळली. कुठलीही संरक्षण भिंत या विहिरीला नव्हती. मोकळ्या भूखंडात असलेली विहीर रस्त्याला लागूनच असल्यानं हा अपघात घडला. अपघात झाल्यानंतर आणि त्यात नऊ जणांचा मृत्यू झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद मंत्री नरहरी झिरवाळ गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी या प्रकरणात विहिरीचा मालक राजेंद्र राजे याच्यावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल केलाय. राजेंद्र राजेने माध्यमांच्या समोर

1962 च्या दुष्काळावेळी ही विहीर बांधण्यात आली. या विहिरीला जाळी लावण्यात आली होती पण त्यातले अंगल आणि तारा लोकांनी चोरून नेल्या तिथे विहीर असल्याचा बोर्ड सुद्धा लावला होता पण तो बोर्ड पडला जी घटना घडली त्याचा आम्हालाही दुःख आहे हळहळ आहे अशी प्रतिक्रिया दिली पण स्थानिकांनी दावा केला की याआधी सुद्धा या विहिरीत पडून जनावर दगावली होती. एक मोटर चालक सुद्धा पडला होता. ही विहीर बुजवण्याची मागणी तेव्हाही करण्यात आली होती. ज्यांची विहीर आहे त्यांच्या घराला कंपाउंड आहे मग विहरीला कंपाउंड का घातलं नाही एका बाजूला रस्ता आहे मध्ये विहीर

आहे आणि दुसऱ्या बाजूनेही रस्ता आहे असं भोंगळ कारभार केल्याप्रकरणी कोणाला दोषी ठरवायचं अस संतप्त सवाल सुद्धा स्थानिकांनी केला तर या सगळ्या प्रकरणात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की या प्रकरणात दिंडोरी पोलिसांकडून तपास सुरू आहे गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे ही विहीर का बुजवण्यात आली नाही त्यावर कंपाऊंड का नव्हतं आणि इतक्या जवळ रस्ता असताना परवानगी कशी मिळाली बांधकाम कसं झालं अशा प्रत्येक गोष्टीची चौकशी करण्यात येईल तर मंत्री नरहरी जिरवाळ यांनी कंपाउंड बांधण्याबद्दल किंवा विहीर


पूर्णपणे बुजवण्याबद्दल तातडीने निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली सोबतच त्यांनी मृतांच्या वारसांना आर्थिक मदतीची ही घोषणा केली पण चिडलेल्या नातेवायकांनी झिरवळांच्या समोरच वारसच राहिले नाहीत तर आर्थिक मदत कोणाला द्यायची असा संतप्त सवाल केला मंत्री गिरीश महाजन यांनी मृतांच्या नातेवाईकांना पा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या दुर्दैवी अपघाताबद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केली आता या सगळ्यात दिंडोरी पोलीस अपघात नेमका कशामुळे झाला अपघाताचं नेमकं कारण काय याचा तपास करतायत. सोबतच खाजगी क्लास चालक सचिन वडजे यांची चौकशी सुद्धा होणार आहे.

त्यांनी सुरक्षे संदर्भात काळजी घेतली होती का? कार्यक्रमासाठी परवानगी घेतली होती का? याची चौकशी पोलीस करतील. पण मूळ प्रश्न हा आहे की रस्त्याच्या इतक्या जवळ असलेली ही विहीर बुजवण्यात का आली नाही या आधी विहिरीत पडून जनावर दगावली असूनही कशाची वाट पाहिली गेली अर्थात यात चूक कोणाची दुर्लक्ष कोणी केलं याची उत्तर चौकशीतून समोर येतीलही पण सहा चिमुकल्यांसह गेलेले नऊ जीव मात्र पुन्हा परत येणार नाहीत हे दुर्दैव


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या